मनातलं कोणालातरी सांगावसं वाटतंय
असं नाहीये की कोणी बोलायला नाहीये
आजूबाजूला जिवलग आहेत आणि आहेत विचारणारे
तरीपण
आजकाल फक्त लिहावंसं वाटतंय
मनातलं कोणालातरी सांगावसं वाटतंय
खरं याचं कारण कळलंय मला
मला माझ्या भावनांना आवरणार नकोय
माझ्या बोलण्यातला चुका काढणारं नकोय
नकोय कोणी माझ्या विचारांना विचारणारं
नकोय कोणी भांडणारं, नकोय कोणी समजुन घेणारं
मला हवंय फक्त कोणीतरी माझं ऐकणारं
मी बोललेलं ऐकून माझं गुपित लपवणारं
आणि म्हणूनचं
आजकाल फक्त लिहावंसं वाटतंय
मनातलं कोणालातरी सांगावसं वाटतंय
एकदम छान....
ReplyDeleteसुंदर वर्णन
ReplyDeleteMast
ReplyDeleteछान मँम
ReplyDelete